Site icon कीर्ती ध्वज न्यूज

सरकारला शेतकरी कर्जमाफी, शक्तीपीठ रद्दची सुबुद्धी देरे विठ्ठला..!

सरकारला शेतकरी कर्जमाफी, शक्तीपीठ रद्दची सुबुद्धी देरे विठ्ठला..!

— आमदार सतेज पाटील, स्वाभिमानाचे नेते राजू शेट्टी यांच्यासह शेतकऱ्यांचे पंढरपुरातील विठ्ठलाला साकडे

पंढरपूर ( प्रतिनिधी )
राज्यातील शेतक-यांची संपुर्ण कर्जमुक्ती करावी व राज्यातील जनतेवर अन्यायकारक असणारा शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याची सदबुध्दी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सुचावी. यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी व विधीमंडळातील गटनेते आमदार सतेज पाटील , खासदार प्रणिती शिंदे यांनी पंढरपूर येथील महाराष्ट्रातील गोरगरीब व कष्टकरी जनतेचे आराध्य दैवत पांडूरंगास साकडे घातले.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ६ जुलै रोजी पंढरपूर येथे पांडुरंगाची सपत्नीक शासकीय पूजा करणार आहेत. या पुजेच्या आधी मुख्यमंत्र्यांनी विधानसभा निवडणुकीत दिलेला राज्यातील शेतक-यांचा सात बारा कोरा करून संपुर्ण कर्जमुक्तीच्या निर्णयाची तातडीने अमलबजावणी करावी. तसेच राज्यातील जनतेवर व शेतक-यावर अन्यायकारी ठरणारा शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याची सुबुध्दी सुचावी या मागणीसाठी पंढरपूरात आज शेतक-यांना मोठी गर्दी केली होती.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चौकातून सर्व शेतकरी एकत्रित येत विठ्ठल मंदिरासमोरील नामदेव पायरीवर पांडुरंगास अभिषेक घालून साकड घालण्यात आले. राज्य सरकारला जर शेतक-यांची कर्जमाफी करण्यास व शक्तीपीठ रद्द करण्याची सुबुद्दी सुचली नाही तर या सरकारच्या विरोधात लढण्याची ताकद देण्याचे साकड घालण्यात आले.
यावेळी शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख विजय देवणे , युवा आघाडी प्रदेशाध्यक्ष दामोदर इंगोले, परभणी जिल्हाध्यक्ष किशोर ढगे स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष अजित पोवार , कॅा. सम्राट मोरे , महेश खराडे , अनिल पवार , पोपट मोरे , धनाजी पाटील , विठ्ठल मोरे , शशिकांत खोत , सचिन शिंदे , तानाजी बागल , धनंजय महामुलकर , विजय रणदिवे , राजाराम देसाई यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते.

Exit mobile version